लोकसभा निवडणूक: तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस

बारामती, 05 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. हे मतदान येत्या 7 मे रोजी पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व राजकीय पक्षांच्या वतीने संबंधित मतदारसंघांत सध्या जोरदार प्रचार करण्यात येत आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत.

https://x.com/CEO_Maharashtra/status/1782444841382879612

येथे तिसऱ्या टप्प्यात मतदान!

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 258 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी रायगड लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार, बारामतीत 38, उस्मानाबाद 31, लातूर 28, सोलापूर 21, माढा 32, सांगली 20, सातारा 16, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 9, कोल्हापूर 23 आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर ह्या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.

बारामती मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. कारण, बारामतीत यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयींमध्ये सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने निकाल लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *