बारामती वनपरिक्षेत्र कार्यालयावर यशवंत ब्रिगेडचा मोर्चा

बारामती, 24 जुलैः बारामती, दौंड व इंदापूर तालुक्यातील मेंढपाळ बांधवांवर गेल्या अनेक वर्षांपासून भटकंती करत आहे. स्वतःची शेती नसल्यामुळे, तसेच पुरेशा चाऱ्या अभावी आपले गाव सोडून गावोगावी भटकंती करून मेंढपाळी करणाऱ्या मेंढपाळ बांधवांवर गेल्या अनेक दिवसांपासून बारामती तालुक्यातील स्थानिक शेतकरी यासह टवाळखोर व वनकर्मचाऱ्यांकडून होणारे हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पारवडी येथे लहान मुलीच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. या घटनेने तर विकृतीचा कळस गाठला आहे, जणू काही माणुसकीचं संपली का काय?, असा प्रश्न पडतो. बारामती तालुक्यातील सूपा येथील अभय अरण्य तसेच बारामती वनपरिक्षेत्रातील मेंढपाळ यांच्यावर वनकर्मचारी अन्याय करीत आहेत. या हल्ल्यांत मेंढपाळ, महिला, लहान मुले लक्ष केली जात आहेत. तसेच बारामती, सूपा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी मेंढपाळांची बकरी उचलून घेऊन जातात आणि पैशाची मागणी केली जाते, अशी मेंढपाळांची तक्रार आहे.

पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

यासह महिलांना धमकावणे, अरेरावी शिवीगाळ करणे असे अनेक प्रकार सुरू आहेत. बारामती तालुक्यातील सुपा, उंडवडी, शिर्सुफळ येथे इंग्रजांच्या काळापासून चरावू कुरणे राखीव होती. ती शोधून तेथे मेंढ्या चारण्यास परवानगी द्यावी. मेंढपळांवरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे मागे घ्यावेत, तसेच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वनपरिक्षेत्र पुणे बारामती विभाग, एमआयडीसी येथील कार्यालयावर यशवंत ब्रिगेड व मेंढपाळ यांचा मेंढ्या सहित गुरुवार, 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोनवलकर यांनी सांगितले. या निवेदनावर अहिल्या सावित्री सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अर्चना पाटील, संपतराव टकले, रासपचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड. अमोल सातकर, वसंतराव घुले, माणिकराव काळे, पाटस गावचे माजी सरपंच संभाजी खडके, गणेश कोळपे, संभाजी शिंदे आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *