बारामती/मुर्टी, 2 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) सध्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठींबा मिळत असून जागो जागी मराठा आंदोलकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे मंत्री मंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत वाटाघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही.
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची कोर्टात धाव
आज, गुरुवारी (दि.2 नोव्हेंबर) जरांगे पाटलांच्या उपोषणाला 9 दिवस पुर्ण होत आहेत. यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या अजूनही पुर्ण न झाल्याने राज्यातील मराठा समाज आता तीव्र स्वरुपात आंदोलन करताना दिसत आहेत. या अनुसंगाने बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील मराठा समाजाने सर्व राजकीय नेत्यांना गाव बंदी केली आहे. तसेच जरांगे पाटलांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. यासह येत्या 4 नोव्हेंबर पासून मुर्टी गावात मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
असले व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही – श्रीकांत शिंदे
One Comment on “मुर्टी गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी!”