सुप्रीम कोर्टाचा निर्णय आशेचा किरण आणि उज्वल भविष्याचे वचन आहे – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याने याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1734106830845133108?s=19

“कलम 370 रद्द करण्याबाबतचा आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक आहे. त्यामुळे भारतीय संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या कायम ठेवण्यात आला आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील आपल्या भगिनी आणि भावांसाठी ही आशा, प्रगती आणि एकतेची जबरदस्त घोषणा आहे. या निकालामुळे सुप्रीम कोर्टाने आपल्या प्रगल्भ शहाणपणाने एकतेचे मूलतत्त्व दृढ केले आहे, जे भारतीय म्हणून आपण त्याचा सर्वांपेक्षा अधिक आदर करतो,” असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.



“मी जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या संयमी लोकांना हे आश्वासन देऊ इच्छितो की तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कलम 370 चा वाईट परिणाम झालेल्या समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित घटकांपर्यंत प्रगतीचे लाभ पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. आजचा निकाल हा केवळ कायदेशीर निर्णय नाही, तर हा आशेचा किरण आणि उज्वल भविष्याचे वचन आहे. एक मजबूत, अधिक अखंड भारत निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाचा दाखला आहे,” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

https://x.com/ANI/status/1734111385611817226?s=20

तसेच यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करीत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. “कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवणाऱ्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्याचा दूरदर्शी निर्णय घेतला. तेव्हापासून जम्मू-काश्मीर मध्ये शांतता आणि सामान्यता परत आली आहे.” असे अमित शाह या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *