मुंबई, 26 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतीय संविधान दिनानिमित्त आज मंत्रालयाच्या प्रांगणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली
“भारतीय संविधानाची उद्देशिका ही सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य बहाल करते. देशातील नागरिकांना हे स्वातंत्र्य देऊन त्यांना अधिक सबल बनवणे हेच भारतीय संविधान निर्मितीमागील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे उद्दिष्ट होते, जे त्यांनी या उद्देशिकेतून मांडले आहे.” असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
संविधानाच्या बाजूने आम्ही उभे राहणार – प्रकाश आंबेडकर
दरम्यान, दरवर्षी 26 जानेवारीला संविधान दिन साजरा केला जातो. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. त्यानंतर देशात हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. देशात संविधान दिन साजरा करण्याची परंपरा 2015 साली सुरू झाली. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले. संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणून संविधान दिन उत्साहात साजरा केला जातो. संविधानाने नागरिकांना नुसतेच अधिकार दिले नाहीत, तर देशाच्या प्रती कर्तव्याची जाणीवही करून दिली आहे. संविधानिक मूल्यांचा आणि संविधानाचा आदर राखणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
2 Comments on “मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन”