प्रेमविवाह केल्यानंतर नवविवाहित जोडप्याची हत्या

तामिळनाडू, 03 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना तामिळनाडूच्या दक्षिणेकडील थुथुकुडी या जिल्ह्यात घडली. धक्कादायक बाब म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मैरिसेल्वम (24) आणि कार्थिगा (20) असे या जोडप्याचे नाव असून हे जोडपे एकाच समाजाचे होते. तसेच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे हे दोघे 30 ऑक्टोबर रोजी कोविलपट्टी येथे घरातून निघून आले होते. त्यांनी त्याच दिवशी उपनिबंधक कार्यालयात एकमेकांसोबत लग्न केले. ते दोघे बुधवारपर्यंत कोविलपट्टी येथेच राहिले.

एल्विश यादव वरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

तर हे जोडपे गुरुवारी मुलाच्या घरी आले. यावेळी मुलाच्या घरच्यांनी देखील या दोघांचा स्वीकार केला. त्यानंतर सायंकाळी सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्या घरात घुसून या जोडप्याची हत्या केली. दरम्यान हा हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या घरी कोणीच नव्हते. तर त्यांची हत्या करून हे हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी या जोडप्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून सध्या या हत्याकांडाचा पोलीस तपास करीत आहेत. यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत.

सुनील तटकरेंचे निलंबन करा- सुप्रिया सुळे

सध्या या घटनेमागील आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान या घटनेमुळे या परिसरात घबराट पसरली आहे. तसेच याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे. तर या हत्याकांडाच्या मागे मुलीच्या कुटुंबाचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे.

One Comment on “प्रेमविवाह केल्यानंतर नवविवाहित जोडप्याची हत्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *