बारामती, 22 जुलैः प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्याप्रचार रथाचा शुभारंभ आज, 22 जुलै 2022 रोजी बारामती येथील उपविभागीय कार्यालय येथे करण्यात आला. या रथाचा शुभारंभ बारामतीचे उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
यासह सिताफळ, बाजरी, भुईमूग, तूर, सोयाबीन व कांदा या पिकांची विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे. या पिकांचा विमा नजीकच्या महा ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र व राष्ट्रीयकृत बँकेत भरता येईल. शेतकऱ्यांनी फळपीक विमा प्रतिनिधी प्रतीक कदम (भ्रमणध्वनी क्रमांक 9834216818) व पीकविमा प्रतिनिधी पांडुरंग नलवडे (भ्रमण ध्वनीक्रमांक 8830036443) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी यावेळी केले आहे.
‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वीपणे राबवण्याच्या तहसिलदार पाटील यांच्या सूचना