एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 10 प्रवाशी ठार 30 जखमी

नाशिक, 30 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 प्रवाशी जागीच ठार झाले तर 30 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जळगावहून वसई विरारकडे जात होती. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील राहुड घाटात आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तर बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1785184204487000540?s=19

स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून बचावकार्य

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू केले. तसेच त्यांनी यावेळी जखमींना बसच्या बाहेर काढून स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. या अपघातात 30 जण जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक थांबली होती. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

टायर फुटल्याने अपघात

दरम्यान, या अपघातावेळी सबंधित बसमध्ये जवळपास 45 प्रवाशी प्रवास करीत होते. ही बस आज सकाळी नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरून जळगावहून वसई विरारकडे जात होती. त्यावेळी दहाच्या सुमारास नाशिकच्या चांदवड येथील राहुड घाटात या बसचा टायर फुटला, त्यामुळे ही बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यामुळे ही बस चक्काचूर झाली आहे. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू, तर 30 प्रवाशी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तर या अपघाताचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *