मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यातील शेती पिकांची पाहणी केली

नागपूर, 07 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे तेथील शेती पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्यासह कृषी, पणन, महसूल विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1732719181278437735?s=19

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील ईसापूर, तार्सा आणि निमखेडा तार्सा या गावांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी या शेतकऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. गेल्या एक-दोन दिवसांत या पावसामुळे येथील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1732738176970846402?s=19

या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. सरसकट पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच निसर्गाच्या या अस्मानी संकटात हे राज्य सरकार बळीराजा सोबत खंबीरपणे उभे आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.



राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *