मुंबई, 29 जूनः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनाम दिला आहे. हा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईवच्या माध्यमातून दिला आहे. या राजीनाम्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी अखेर कोसळलं आहे. राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी ‘आपण उद्यापासून पुन्हा शिवसेना भवनात बसणार आहे, असे म्हटले आहे. ‘माझ्या विरोधात किती लोक, याने मला फरक पडत नाही, कुणाकडे किती बहुमत, यात मला रस नाही, माझा एक माणूस विरोधात असेल तर ते माझ्यासाठी लज्जास्पद’ असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राजीनाम दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिवसैनिकांना शांततेचे आवाहनही केले आहे. उद्या कोणीही शिवसैनिकांनी त्यांच्या मार्गात येऊ नका, कुठलाही गोंधळ घालून नका, असे म्हणत शिवसैनिकांना आवाहन केले. यासह लोकशाहीचा मान राखल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारी यांनाही धन्यवाद दिले आहे.
तसेच शिवसेना प्रमखांच्या मुलाला सत्तेवरून खालू खेचलं, याचे पेढे खाऊ द्यात, वाटु द्यात, त्याचा गोडवा त्यांना लखलाभ, असे ठाकरेंनी म्हटले. तसेच मला शिवसैनिकांच्या आशिर्वादाचा गोडवा हवा, त्यात मला आनंद असल्याचे भावनिक होत उद्धव ठाकरेंनी म्हटले.