निरा नदीचा विसर्ग केला बंद

निरा, 13 सप्टेंबरः पुरंदर आणि खंडाळा तालुक्याच्या सिमेवरून वाहणाऱ्या निरा नदीवर वीर धरण बांधण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात या वीर धरणासह आसपासच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे निरा नदीत विसर्ग करण्यात येत होता. मात्र आता हा विसर्ग आज, 13 सप्टेंबर 2022 रोजी बंद करण्यात आला आहे. यामुळे नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

सांगवीमधील डॉक्टर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल

सद्यःस्थितीला वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातून 1100 क्युसेक आणि डावा कालवा विद्युतगृहातून 900 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून सकाळी 7 वाजता विसर्ग बंद करण्यात आला आहे.

नीरा नदीपात्रात एकूण 2000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो, याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *