चंद्रपूर, 30 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रात गेल्या 3 वर्षांपासून दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला वन अधिकाऱ्यांनी अखेर पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. या वाघिणीने गेल्या 3 वर्षांत 11 जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण होते. अखेर या वाघिणीला पिंजऱ्यात जेरबंद केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाघिणीला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर या वाघिणीला सुरक्षित स्थळी पाठविण्यात आले आहे.
https://x.com/ANI/status/1840589896030818306?t=SLnU_yqcizQ0KmfbHlhGrQ&s=19
3 वर्षांत 11 लोकांचा बळी
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून या वाघिणीने चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घातला होता. या वाघिणीने गेल्या 3 वर्षांत 11 लोकांना ठार केले होते. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अशा परिस्थितीत वनविभागाचे अधिकारी मागील काही काळापासून या वाघिणीला पकडण्यासाठी जीवाचे रान करीत होते. यादरम्यान, त्यांनी या परिसरात वाघिणीला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावले होते. परंतु, ही वाघीण त्या पिंजऱ्यांमध्ये काही जात नव्हती. त्यामुळे यामध्ये वन विभागाला काही यश येत नव्हते.
वाघिणीला बेशुद्ध करून पकडले
अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.30) या दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला शूट करून बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिला त्यांनी उचलून पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे वन विभागाचे हे मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. या वाघिणीला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून विशेष पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकात पशुवैद्य व इतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, दहशत निर्माण करणाऱ्या या वाघिणीला पकडल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले आहेत.