राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली! पहा कोणते निर्णय घेण्यात आले

मुंबई, 24 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध विभागाचे मंत्री उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

https://x.com/CMOMaharashtra/status/1815711706511016138?s=19

मंत्रिमंडळातील निर्णय खालीलप्रमाणे 

यासोबतच राजे यशवंतराव होळकर महामेष’ योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांची नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता येणार आहे.

दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण लागू

दिव्यांग कर्मचाऱ्यांना 30 जानेवारी 2016 पासून पदोन्नतीसाठी 4 टक्के आरक्षण धोरण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे या 51 सदनिकांच्या भाडे खर्चासाठी 7 कोटी 34 लाख 40 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *