देशात अंदाजे सरासरी 60.09 टक्के मतदान; राज्यात 54.33 टक्के मतदान

मुंबई, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यात काल मतदान पार पडले. राज्यात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान झाले. या मतदानाची सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, राज्यात पाचव्या टप्प्यात काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 54.33 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यामध्ये दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 56.61 टक्के मतदान झाले आहे. तर कल्याणमध्ये सर्वात कमी 47.08 टक्के मतदान झाले आहे.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1792627681097351430?s=19

राज्यातील मतदानाची टक्केवारी

पाचव्या टप्प्यात धुळे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 56.61 टक्के मतदान झाले आहे. तसेच नाशिक – 57.10 टक्के, दिंडोरी – 62.66 टक्के, ठाणे – 49.81 टक्के, कल्याण – 47.08 टक्के, पालघर – 61.65 टक्के, भिवंडी – 56.41 टक्के, मुंबई उत्तर – 55.21 टक्के, मुंबई उत्तर मध्य – 51.42 टक्के, मुंबई उत्तर पूर्व – 53.75 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – 53.67 टक्के, मुंबई दक्षिण – 47.70 टक्के आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सरासरी 51.88 टक्के इतके मतदान झाले आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1792702142408761604?s=19

देशात इतके मतदान

तसेच देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काल लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. त्यानुसार देशात काल सरासरी 60.09 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक सरासरी 74.65 टक्के मतदान झाले आहे. याशिवाय बिहारमध्ये सरासरी 54.85 टक्के मतदान झाले आहे. तर जम्मू आणि कश्मीर – 56.73 टक्के, झारखंड – 63.07 टक्के, लडाख – 69.62 टक्के, महाराष्ट्र – 54.29 टक्के, ओडिशा – 67.59 टक्के, उत्तर प्रदेश – 57.79 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये सरासरी 74.65 टक्के मतदान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *