राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय! पाहा काय काय निर्णय झाले?

मुंबई, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारकडून विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते.



मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात

1) मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर.
2) पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला 15 हजार रुपये.
3) अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता.
4) केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या 153 कोटी हिस्स्याला मान्यता.
5) श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार.
6) कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. 3200 कोटींचा प्रकल्प असणार.
7) भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज.
8) राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ.
9) महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार.
10) मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. 35 गावांना लाभ होणार.
11) मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. 125 हेक्टर जमीन सिंचित करणार.
12) शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना 25 हजार रुपये अनुदान.


13) मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.
14) आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.
15) कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी 9020 कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
16) शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार. त्यासाठी 11 हजार 585 कोटींच्या प्रकल्पास मान्यता.
17) पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार.
18) पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता.
19) म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन.
20) आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ.
21) मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार.
22) मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता.
23) मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23 हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते.
24) भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार.
25) महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन.
26) जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. 2453 कोटी राज्याच्या हिस्स्याला मान्यता.
27) दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांना अधिकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *